मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

“विटभट्टी परिसरातील पाण्याच्या समस्येला दिलासा; विहिरीच्या पाहणीसह तातडी उपाययोजना सुरू – श्रेया शिंदे”

अलीम इनामदार (मुंबई) गोरेगाव – विटभट्टी भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाला आता दिलासा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणी, वेदना…

Editor संवाददाता
December 11, 2025 1 मिनट की पढ़ाई 2 बार देखा गया

अलीम इनामदार (मुंबई)

गोरेगाव – विटभट्टी भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाला आता दिलासा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणी, वेदना आणि सततच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आज विहिरीची सविस्तर पाहणी करण्यात आली.

 

या पाहणी उपक्रमाचे नेतृत्व श्रेया गणेश शिंदे यांनी केले असून, विहिरीहून थेट शौचालयांपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचा त्वरित निर्णय घेण्यात आला आहे. “ही फक्त योजना नाही, तर लोकांच्या दैनंदिन जगण्यात बदल घडवणारी ठोस कृती आहे,” असे श्रेया शिंदे यांनी सांगितले.

 

पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

स्थानिकांच्या अनेक वर्षांच्या तक्रारींना प्रतिसाद देत जलपुरवठा सुधारण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

 

जनतेच्या अडचणींवर शब्दांपेक्षा कृतीतून उत्तर देण्याचा निर्धार — हा नेतृत्वाचा खरा विश्वास असल्याचे श्रेया शिंदे यांनी नमूद केले.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *